बातमी कट्टा:- घराच्या छताला साडीने गळफास घेत 27 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ब्राम्हणपुरा भागातील संदीप दत्तात्रय गुरव वय 27 या युवकाने घराच्या छतास लाकडी दांडीच्या कडील साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 6 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.मयत संदीप गुरव याच्या आत्महत्याचे कारण समजु शकलेले नाही. याबाबत दगडू वंजी गुरव यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात खबर दिल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे.