बातमी कट्टा:- माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत महापालिकेने पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने प्लॉगिंग रेसचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्पर्धेत सहभागी दीड हजार तरुणांनी धावत जाऊन दोन टन कचरा संकलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील सहभाग नोंदवत नदीपात्रातील कचरा गोळा केला.
प्लॉगिंग स्पर्धा हि चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. यावेळी धुळे शहरातील सिध्देश्वर गणपती मंदीर,आई एकविरा देवी मंदीर,पोलीस मुख्यालय येथील विविध संस्थांच्या व अधिकारींच्या उपस्थितीत रॅलीस सुरुवात करण्यात आली होती.
कालिका माता मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सहभागी तरुणांना स्वच्छतेची शपथ दिली.