तापी पुलाच्या कठड्यावर खडुने गावाच नाव लिहीले मग तापीत केली आत्महत्या…

बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि ८ रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर गावातील ज्ञानेश्वर कमलसिंग जाधव वय ४२ यांनी आज दि ८ रोजी सकाळच्या गिधाडे तापी नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.ज्ञानेश्वर जाधव यांनी आत्महत्या पुर्वी तापी पुलाच्या कठड्यावर पांढऱ्या रंगाच्या खडूने अहिल्यापूर असे गावाचे नाव टाकत पुलावर चप्पल सोडून तापी नदीपात्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सावळदे गावाचे उपसरपंच सचिन जाधव ,समाधान राजपूत यांच्यासह अहिल्यापुर गावातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.शोध सुरु असतांना ज्ञानेश्वर जाधव यांचा पाण्यात मृतदेह आढळून आला. मयत ज्ञानेश्वर जाधव यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी मुलगा असा परिवार होत‌.त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: