त्या उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी दिल्या “जय जवान जय किसान” च्या घोषणा…

बातमी कट्टा:- सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना शिरपूर पंचायत समिती आणि बांधकाम विभागाच्या बाहेर आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.यावेळी त्यांनी जय जवान जय किसान,भारत माता की जय अशा घोषणा देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात सहभाग नोंदवला.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.आज त्या शेतकऱ्यांचा तिसऱ्या दिवसही उपोषण सुरुच आहे.

काय आहे मागणी …

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येते तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करावा याबाबत निवेदन दिले आहे.

याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथीव सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: