बातमी कट्टा:- पाच दिवसांपासून कार्यालय बाहेर अमरण उपोषण सुरु असून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने एका उपोषणकर्ते शेतकऱ्याने आज दि 12 रोजी सायंकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला असून अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.आज दि 12 रोजी त्या शेतकऱ्यांचा पाचव्या दिवसही उपोषण सुरुच असतांनाच आज शेतकरी उपोषणकर्ते संजय पाटील यांनी सायंकाळी पेट्रोल अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
काय आहे मागणी :-
अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येत असते.तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथील सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.