पांझरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बातमी कट्टा: अक्कलपाडा मध्यम प्रकल्प अक्कलपाडा ता. साक्री या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासांत वाढ झाली असून सद्य:स्थितीत पाणीपातळी सतत वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासांत पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने पांझरा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पांझरा काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरे-ढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय गायकवाड यांनी कळविले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: