बातमी कट्टा:- आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करुन देखील दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकवेळा उपोषणाचा ईशारा दिला आहे.वारंवार निवेदन देऊन आणि पंचायत समिती बाहेर भर पाऊसात उपोषण करुन देखील कुठलीही हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागत आहे.प्रगतशील तालुक्यात शेतकऱ्यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागत असणार तर याला नेमक कोण जबाबदार आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागत असणार तर हे नक्की तालुक्यातील राजकारण,आणि प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल.
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले होते.आमदार आणि जि.प अध्यक्षांनी मध्यस्थी करत दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देऊन देखील दोन महिन्यात दखल घेण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे.
शेतकऱ्यांची काय आहे मागणी …
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे. त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येत असते. तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथील सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण केले होते.
उपोषणकर्ते शेतकरी मरणाच्या दारावर आल्यानंतर आमदार आणि जि.प अध्यक्षांनी मध्यस्थी केली वर यावर दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्या लेखी आश्वासनामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली होती.मात्र दोन महिन्यात दखल घेतली गेली नसल्याने त्या शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा ईशारा दिला आहे.शिरपूर तालुका प्रगतशील तालुका म्हटला जातो मग येथील शेतकऱ्यांना का म्हणून पुन्हा आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागत असणार तर हे तालुक्यातील राजकारण आणि प्रशासनासाठी लाजीरवाणी बाब म्हणावे आगेल.