बातमी कट्टा:- सर्प दंशाने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वादळी वारा सुरु असतांना घलाचा मागील दरवाजा बंद करण्यासाठी गेले असतांना पायाला अचानक सापाने सर्पदंश झाला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 7 रोजी शिरपूर तालुक्यातील भोईटी येथील अवकाबाई भाऊराव भिल वय ४० या काल घरी असतांना सायंकाळच्या सुमारास अचानक जोराने वादळी वारा येण्यास सुरुवात झाली होती.यावेळी अलकाबाई भिल या घराचा मागील दरवाजा बंद करण्यासाठी गेले असता त्यांच्या पायाला सर्पाने दंश केल्याने अलकाबाई भिल खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल गंभीर अवस्थेत दाखल केले असता उपचारादरम्यान अलकाबाई भिल यांचा मृत्यू झाला आहे.