बातमी कट्टा:- मध्यरात्री दुकानाला अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकानच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने दुकानाजवळच असलेल्या लाईन डिपीजवळ आग पोहचली नाही.अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.या आगीत दुकानाचे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाले आहे.दुकानाला लागलेल्या आग बघुन दुकान मालकाच्या डोळ्यात पाणी आले.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि आज मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास शहरातील पातळेश्वर मंदीराजवळील पाताळेश्वर कॉम्प्लेक्स मधील जयेश सेल्स & सर्विसेस या दुकानाला भीषण आग लागली यात संपूर्ण दुकानातील गॅस ग्रीझर,मिक्सर,सेगड्या,लहान चक्की,कुलर,बजाजचे कंपनीचे इलेक्ट्रॉनीक वस्तू आदी साहीत्य यात जळून खाक झाले आहे.सुमारे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाले आहे यात दुकानाजवळ विजवाहीनीची डि.पी होती सुदैवाने त्या डि.पी पर्यंत आग पोहचली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.मात्र या आगीत जयेश सेल्स & सर्विसे या दुकानातील संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

घटनास्थळी तात्काळ पोलीस यंत्रणा दाखल झाली कुठलीही दुर्घटना घडु नये यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी शिरपूर नगरपरिषदेचे अग्निशमन वाहनाला बोलविण्यात आले होते.मात्र घटनास्थळी अग्निशमन वाहन आल्यानंतर 20 ते 25 मिनीटे वाहनात बिघाड असल्याने पाणी पुरवठा होऊ शकला नाही.यावेळी आणखी दुसऱ्या अग्निशमन बंबाला बोलविण्यात आले होते.त्यानंतर आग आटोक्यात आणली.
मध्यरात्री अचानक झालेल्या या भीषण आगीमुळे सर्वत्र धावपळ उडाली होती.त्यात जवळच विजवाहीनीची डिपी असल्याने तात्काळ लाईट बंद करण्यात आली होती.यामुळे अंधारमय परिसरात सर्वांची धावपळ उडाली होती.