बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर भीषण अपघात घडला आहे.मोटरसायकलीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला जखमी आहे.ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक पुढे जाऊन रस्त्यावर ट्रक उभा करुन चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातील रुदावली येथे आज भाऊबंधकीतील सदस्य मयत झाल्याने अंतयात्रेसाठी नगाव येथून एकाच मोटरसायकलीवर पती पत्नीसह गावातील एक जण असे मोटरसायकलीने नगाव येथून रुदावली येथे आले होते.अंतयात्रा झाल्यानंतर तीनही जण मोटरसायकलीने नगाव येथे जाण्यासाठी निघाले होते.यावेळी कमखेडा फाटा नजीक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलीला जोरदार धडक दिली.या अपघात मोटरसायकलीवर रविंद्र पाढुरंग पाटील व त्यांच्या सोबत असलेला नगाव येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर मयत रविंद्र यांची पत्नी भटाबाई रविंद्र पाटील या जखमी झाले.त्यांना तात्काळ उपस्थितांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.यावेळी धडक दिल्यानंतर ट्रक घटनास्थावरुन फरार होत असतांना नरडाणा जवळ पोलीस असल्याचे बघुन ट्रक चालक रस्त्यावर ट्रक उभा करुन तेथून पसार झाला आहे.रविंद्र पाटील यांचे मुळगांव रुदावली येथील असुन ते कुटुंबासहीत नगाव येथे स्थाहीक झाले होते असे सांगण्यात येत आहे.