बातमी कट्टा :- शेतकरी हिताचा निर्णय घेत आडतशिवाय शेतकर्यांच्या शेतमालाची खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रीयेस आजापासून बाजार समितीमध्ये सुरुवात झाली असून आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सदर लिलाव प्रक्रिया पार पडली. शेतकर्यांना आपला शेतमाल विकत असतांना आर्थिक फायदा व्हावा आणि शेतकर्यांच्या घामाच्या दामाची रक्कम तत्काळ रोखीने अथवा आरटीजीएस,धनादेशाने मिळावी म्हणून आ.कुणाल पाटील यांच्या सूचनेनुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दरम्यान धुळे बाजार समितीत अमुलाग्र बदल घडविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून शेतकर्यांचे हित लक्षात घेता कांदा खरेदीही खुल्या पध्दतीने करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत म्हणून धान्यभूसार,कडधान्य, भुईमुंगशेगा या शेतीमालाची आडत्याशिवाय थेट शेतमाल खरेदी हा निर्णय घेण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी केल्या होत्या. त्यानुसार हा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी आज दि.13 सप्टेंबरपासून धुळे बाजार समितीत करण्यात आली. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रीसाठी आलेल्या शेतमालाची पुजा तसेच शेतकर्याचा सत्कार करुन लिलावास सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, शेतकर्यांना आडत्यास दोन ते अडीच टक्के आडत द्यावी लागत होती मात्र या निर्णयामुळे ती आडत न देता बचत होणार आहे.आवक वाढून थेट खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळणार आहे. या लिलाव प्रक्रीयेत शेतकर्यांना फक्त हमाली व मापाईसाठी लागणारी रक्कमच अदा करावी लागणार आहे.आणि शेतमाल विक्री नंतर लगेच शेतकर्याला आपल्या घामाचा दाम रोखीने अथवा धनादेशाने मिळणार आहे. यावेळी बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रामात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती करण्यासाठी आपले प्रयत्न असून धुळे बाजार समितीत शेतकर्यांच्या सोयीचे निर्णय घेतले जातील. धुळे बाजार समितीत गुरांचा मोठा बाजार भरतो त्यामुळे या बाजारात नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचीही योजना आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी बाजार समिती कटीबदध्द असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नेते प्रमोदभाऊ जैन यांनी मार्गदर्शन केले.
कांद्याचा खुल्या पध्दतीचा बाजार- धुळे बाजार समितीत बारदानमध्ये(गोणी)भरुन कांदा विक्रीसाठी आणला जातो, त्यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे.म्हणून येणार्या काळात लवकरच बाजार समितीत कांदा खरेदी खुल्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शेतकर्यांच्या खर्चात बचत होणार आहे.
आमदारांचे लिलाव प्रक्रीयेवर लक्ष- आडत्याशिवाय थेट शेतीमाल खरेदीच्या निर्णयाची आज दि.13 सप्टेंबर पासून आ.कुणाल पाटील यांच्या सूचनेनुसार सुरु करण्यात आली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी लिलाव प्रक्रीयेत लक्ष ठेवून शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
बाजार समितीचे तपासणी पथक- आडत्याशिवाय थेट शेतीमाल खरेदी या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बाजासमितीत सहा जणांचे फीरते पथक राहणार असून या निर्णय प्रक्रीयेत शेतकर्यांच्या मालाचे योग्य मोजमाप करणे, त्याच दिवशी शेतमालाची रक्कम अदा होते कींवा नाही या सर्व बाबींवर लक्ष ठेवत शेतकर्यांची गैरसोय दूर करणार असल्याचे मुख्य प्रशासक रितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात आ.कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,जवाहर सुतगिरणीचे व्हा.चेअरमन प्रमोद जैन, कृऊबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील,भगवान गर्दे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी आ.प्रा.शरद पाटील, शिवसेनेचे महेशभाऊ मिस्त्री, काँग्रेस शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रणजित भोसले, प्रशासक किरण पाटील, साबीर सेठ, कृऊबा प्रशासक झुलाल पाटील, दिनेश माळी, सुदर्शन पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रा.डॉ.दत्ता परदेशी, आप्पा खताळ, विजय चिंचोले, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, दिलीप शिंदे, बळीराम राठोड, प्रदिप देसले, एन.डी.पाटील, सोमनाथ पाटील, सचिव दिनकर पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी संचालक अर्जुन पाटील, आत्माराम पाटील, अरुण पाटील, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, दिनकर पाटील, एस.एम.पाटील, शशीकाका रवंदळे, काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, बापू खैरनार,विशाल सैंदाणे, आबा गर्दे, भटू चौधरी,चंद्राकांत पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, भोलेनाथ पाटील, संतोष राजपूत, भाऊसाहेब पाटील, युवक काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष हर्षल साळुंखे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चव्हाण, अनिल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव दिनकर पाटील यांनी केले तर आभार मुख्य प्रशासक रितेश पाटील यांनी मानले.