“कुंभकर्ण” अवस्थेत असणाऱ्यांना कधी जाग येणार ? शेतकऱ्यांचा दहाव्या दिवशीही उपोषण सुरु, प्रकृती खालवली…

बातमी कट्टा:- झोपेच सोंग घेणाऱ्या संबधीत विभागाला कधी जाग येणार अशी अर्त हाक उपोषणकर्ते शेतकऱ्यांकडून केली जात आहे.देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना स्वताच्या न्याय हक्कासाठी फक्त पाणी पिऊन गेल्या दहा दिवसांपासून अमरण उपोषण कराव लागत आहे.आणि दुर्दैव म्हणजे त्या अन्नदाता शेतकऱ्यांची संबधीत अधिकारी दखल घेतांना दिसत नाहीत.गेल्या दहा दिवसांपासून अमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकृती खालवली आहे.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.आज दि 16 रोजी त्या शेतकऱ्यांचा दहाव्या दिवसीही उपोषण सुरुच असतांना चारही शेतकऱ्यांची प्रकृती खालवली आहे. देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना स्वताच्या न्याय हक्कासाठी फक्त पाणी पिऊन गेल्या दहा दिवसांपासून अमरण उपोषण करावे लागत आहे.आणि दुर्दैव म्हणजे त्या अन्नदाता शेतकऱ्यांची संबधीत अधिकारी दखल घेतांना दिसत नाहीत.

काय आहे मागणी :-
अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येत असते.तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथील सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.त्यातील चार शेतकऱ्याचे उपोषण सुरच आहे.

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना स्वताच्या मागणीसाठी कार्यालय बाहेर उपोषण कराव लागणे आणि त्यात त्यांच्या मागणीकडे केराची टोपली दाखवणे म्हणजे किती दुर्दैव म्हणाव लागेल ? आणखी किती दिवस या शेतकऱ्यांना उपोषण कराव लागेल? संबधीत अधिकारी कधी लक्ष देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: