बातमी कट्टा:- शिरपूर पंचायत समिती बाहेर उपोषण बसलेल्या शेतकऱ्यांपैकी सातव्या दिवशी आज दि 14 रोजी सकाळी एका शेतकऱ्याची प्रकृती खालवल्याने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालवली असून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे.
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.त्या शेतकऱ्यांचे सातव्या दिवसही उपोषण सुरुच आहे.आज उपोषणकर्तें पैकी संजय पाटील या शेतकऱ्याची प्रकृती खालवल्याने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी तीन उपोषणकर्ते शेतकऱ्यांची प्रकृती खालवली आहे.त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले असून न्याय मिळेपर्यंत रुग्णालयात दाखल होणार नसल्याचे त्या शेतकऱ्यांनी भुमिका घेतली आहे.
अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येते तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथील सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.