कन्यादानाचे स्वप्न राहिले अपूर्ण,वधु पित्याचा अपघाती मृत्यू…

बातमी कट्टा:- चार दिवसांनी मुलीचा विवाह असल्याने घरात आनंदीत वातावरण होते.मात्र लग्न घरावर काळाने घाला घातला.दि 19 रोजी शनिवारी लग्नाचा बाजार खरेदी करुन वधुचे वडील,मावशी व वधू मोटरसायकलीने घरी परत येत असतांना ट्रकने धडक दिली यात मुलीच्या वडिलांचा जागिच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील सतिलाल(राजेंद्र) लक्ष्मण पाटील वय 48 यांची मुलगी गायत्री हिचा दि 23 मार्च रोजी विवाह नियोजित आहे.काल दि 19 रोजी सतिलाल पाटील आणि वधु मुलगी गायत्री व वधुची मावशी सुमनबाई धनराज बोरसे रा.बोरीस हे मोटारसायकलीने बाजार करण्यासाठी गेले होते.सोनगीर येथून तिघेही जण मोटरसायकलीने घरी परत येत असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी फाट्याजवळ जी.जे 52 जीऐ 7598 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने मोटरसायकलीला जोरदार धडक दिली. सतिलाल पाटील हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले तर गायत्री व सुमनबाई या जखमी झाल्या आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: