बातमी कट्टा:- शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकऱ्यांने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि ११ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनात मोहनसिंग गिरासे रा.वाडी यांनी दिलेल्या खबर नुसार शिंदखेडा तालुक्यातील वाडी येथील शेतकरी लोटनसिंग इंद्रसिंग गिरासे वय ४५ यांची वाडी शिवारात तिन एकर शेती आहे. शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मालपुर शाखेतून कृषी कर्ज घेतले होते. व ते कर्ज फेडण्याच्या विचाराने तणावात व विंवचनेत होते.दि ११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतकरी लोटनसिंग गिरासे यांनी गावाबाहेरील दिवान गिरासे यांच्या शेतातील विहीरीत उडी घेतल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली असता लोटन गिरासे हे विहीरीतील पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले.त्यांना विहीरी बाहेर काढून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ सुशांत गवांदे यांनी तपासून लोटनसिंग गिरासे यांना मृत घोषित केले. याबाबत खबर देण्यात आली असून शिंदखेडा पोलीस स्टेशनात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.