
बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव डंपरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील शिरपूर टोलनाका जवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे.गिधाडे येथून एम एच १८ डब्ल्यू ७३३१ क्रमांकाची ॲपे रिक्षा शिरपूरकडे येत असतांना ताजपूरी फाट्याकडून येणाऱ्या कोंटम इंडर्शि प्रा.लिमीटेड कंपनीची भरधाव डंपरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.यावेळी रिक्षात अडकलेल्या जखमी प्रवासींना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी डॉक्टरांनी तपासून दगुबाई राजू ठाकरे वय ५२ मयत मरी माता नगर अमळनेर व कमलबाई मंगल ( मगन) मराठे वय ५८ क्रांती नगर यांना मयत घोषित केले तर किशोर मग्न ठाकरे ,प्रतिक्षा विजय ठाकरे ,त्र्यंबक बापु चव्हाण रा. गिधाडे,चालक किशोर अशोक माळी रा. वरवाडे,प्रकाश शांताराम माळी रा. थाळनेर,लालचंद लुका अहिरे रा.शिरपूर आदी जण जखमी झाले आहेत.यातील काही गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती तर यावेळी मयत महिलांच्या नातेवाईकांनी हांबरडा फोडला.शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप खैरनार यांच्या सह पोलिस पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.