शेतकऱ्यांना त्रास होणार होता तर तेथे निधीचा वापरच का केला ?आमदार काशिराम पावरा अधिकारींवर संतापले …

बातमी कट्टा:- निधी हा गावाच्या व जनतेच्या सोय सुविधांसाठी निधी दिला जातो मात्र त्या निधीचा योग्य पध्दतीने वापर होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारींनी योग्य अभ्यास करुनच निधीचा उपयोग करायला पाहिजे अहिल्यापूर येथील शेतकरींना मोरी बांधकामामुळे अडचण येणार होती तर तिथे निधीचा उपयोग करायलाच नको होता.शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांना उपोषणाला बसावे लागल्याचे सांगत आमदार काशिराम पावरा यांनी उपोषणस्थळी संबधीत अधिकारींना धारेवर धरले होते.आमदार पावरा यांनी बांधकाम विभाग बाहेर उपोषण कर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरींनी आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले.आज त्या शेतकऱ्यांचा चौथ्या दिवसही उपोषण सुरुच आहे.

अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येते तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत दि 28 जून रोजी शेतकऱ्यांनी शिरपूर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दखल घेण्याबाबत निवेदन दिले होते.त्यानंतर दि 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याने अखेर दि 8 ऑगस्ट रोजी अहिल्यापूर येथीव सहा शेतकरींनी पंचायत समिती बांधकाम विभागाबाहेर उपोषण सुरु केले आहे.

काल दि 10 रोजी आमदार काशिराम पावरा,सभापती सत्तारसिंग पावरा यांच्यासह गटविकास अधिकारी ,बांधकाम अभियंता यांच्यासह अधिकारी उपोषणकर्ते दाखल झाले होते.यावेळी आमदार पावरा यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.यावेळी आमदार पावरा यांनी संबधीत अधिकारींना धारेवर धरत म्हटले की निधी हा गावाच्या व जनतेच्या सोय सुविधांसाठी निधी दिला जातो मात्र त्या निधीचा योग्य पध्दतीने वापर होणे गरजेचे आहे. संबधीत अधिकारींनी योग्य अभ्यास करुनच निधीचा उपयोग करायला पाहिजे अहिल्यापूर येथील शेतकरींना छोटी मोरी बांधकामामुळे अडचण येणार होती तर तिथे निधीचा उपयोग करायलाच नको होता.शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांना उपोषणाला बसावे लागल्याचे सांगत आमदार काशिराम पावरा यांनी उपोषणस्थळी संबधीत अधिकारींवर रोष व्यक्त केला.त्यानंतर गटविकास अधिकारी,बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी चौकशीसाठी दाखल झाले होते.

WhatsApp
Follow by Email
error: